ठाणे शहर स्वच्छ ठेवण्याची शेकडो विद्यार्थ्यांनी घेतली शपथ

ठाणे शहर स्वच्छ ठेवण्याची शेकडो विद्यार्थ्यांनी शपथ घेतली. शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी जशी महापालिकेची आहे तशीच ती सर्व नागरिकांची देखील आहे. यावेळी विद्यार्थ्यांना ठाणे शहर अधिक स्वच्छ ठेवण्याची शपथ विद्यार्थ्यांना ठाणे स्मार्ट सिटी लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळवी यांनी दिली. केंद्रसरकारच्या स्मार्ट सिटी सर्वेक्षणातंर्गत शहर नागरिक आकलन सर्वेक्षण सुरू आहे. या अंतर्गत विविध उपक्रम ठाणे शहरात राबविण्यात येत असून यामध्ये नागरिकांचा सहभाग घेतला जात आहे. याचाच एक भाग म्हणून विद्यार्थी आणि तरुणांमध्ये जनजागृती करण्याच्या दृष्टीकोनातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास ठाणे शहरातील विविध शाळा आणि महाविद्यालयातील जवळपास 700 हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. शहर स्वच्छ ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी असून यासाठी शहर अस्वच्छ करणाऱ्या व्यक्ती नजरेस पडल्या तर त्या व्यक्तींना स्वच्छतेचे महत्व पटवून देवून रस्त्यांवर थुंकू नका, कचरा टाकू नका असे सांगण्यास विसरु नका असा सल्लाही विद्यार्थ्यांना संदीप माळवी यांनी दिला. यावेळी मी माझ्या घरात, परिसरात, विभागात, शाळेच्या पटांगणात कचरा होवू देणार नाही. जे कचरा टाकतील त्यांना प्रतिबंध करणार, आपले ठाणे शहर स्वच्छतेत नंबर वन करण्याबाबत स्वच्छतेच महत्व इतरांना पटवून देणार अशी शपथ विद्यार्थ्यांना देण्यात आली. तर वासुदेवाच्या माध्यमातून स्वच्छतेबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली. शहर नागरिक आकलन सर्वेक्षणात सहभागी होण्यासाठी eol2022.org या वेबसाईटशी संपर्क साधून 802787 हा ठाणे शहराचा कोड टाकून आपले मत व्यक्त करा असे आवाहनही यावेळी तरूणांना करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना सर्वेक्षणाची माहिती देणारी कापडी टोपी आणि पर्यावरणपूरक कागदी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading