ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांच्याकडून जनतेच्या विविध मागण्यांसाठी मोर्चे, आंदोलने, निदर्शने, घेराव, धरणे, सभा, उपोषणे यासाठी १५ मार्च पर्यंत मनाई करण्यात आली आहे. सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ३७ (१) व ( ३) अन्वये जीवित आणि वित्त सुरक्षित राहण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत. यामध्ये पाच किंवा पाचापेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमणे, जाहीर सभा घेणे, मिरवणुका काढणे घोषणा, प्रति घोषणा देण्यास मनाई करण्यात आली आहे. केवळ पोलीस अधिका-यांनी परवानगी दिलेल्या कार्यक्रमांनाच मुभा राहील असे आदेश ठाणे शहर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिले आहेत.