ठाणे शहराच्या काही भागाचा पाणी पुरवठा उद्या १२ तास बंद राहणार आहे.
ठाणे शहरातील नौपाडा – कोपरी प्रभाग समिती अंतर्गत कोपरी क्षेत्रात असलेले कन्हैयानगर जलकुंभ आणि धोबीघाट जलकुंभ येथील आऊटलेट जलवाहिनी सॅटिस विभागाच्या कामात बाधित होत असल्याने स्थलांतरीत करणे आणि कॉस कनेक्शन करण्याचे काम आवश्यक असल्याने तसेच काशी आई मंदिराजवळ ५०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी गळती होत असल्याने गुरूवारी १ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत शहराच्या काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. या शटडाऊनमुळे कोळीवाडा, सुदर्शन कॉलनी, साईनगरी, नातु कॉलनी, सावरकर नगर, वाल्मीकीपाडा सोसायटी, कुंभारवाडा, गुरुदेव सोसायटी, कृष्णानगर, स्वामी समर्थ मठ, आनंदनगर, गांधीनगर, सिध्दिविनायक नगर, सिध्दार्थ नगर, बारा बंगला, ठाणेकरवाडी, कोपरी गाव, जगदाळे वाडी, पै गल्ली या परिसराचा पाणी पुरवठा पुर्णपणे बंद राहणार आहे. तसंच पाणी पुरवठा पूर्व पदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असून नागरिकांनी पाण्याचा योग्य तो वापर करुन पालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.