ठाणे शहराच्या काही भागाचा पाणी पुरवठा आज रात्री बारा वाजेपर्यंत बंद

ठाणे शहराच्या काही भागाचा पाणी पुरवठा आज रात्री बारा वाजेपर्यंत बंद राहणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि लघु पाटबंधारे विभाग यांनी पाणी कपात जाहीर केली असून त्यानुसार पाणी पुरवठ्याचं नियोजन करण्यासाठी काल रात्री १२ वाजल्यापासून आज रात्री १२ पर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार आहे. यामुळं महापालिकेच्या कळवा, खारेगाव, पारसिकनगर, ओतकोनेश्वरनगर, घोलाईनगर, रेतीबंदर, विटावा, मुंब्रा, दिवा, शीळ, कौसा, डायघर, देसाई तसंच इंदिरानगर, रुपादेवी पाडा वागळे फायर ब्रिगेड, बाळकूम पाडा नंबर १ या परिसराचा पाणी पुरवठा आज रात्री १२ पर्यंत बंद राहणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading