ठाणे शहराच्या काही भागाचा पाणी पुरवठा अचानक खंडीत झाल्यानं या भागातील नागरीकांची चांगलीच तारांबळ उडाली. महापालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेतून ठाणे पश्चिम परिसराला पाणी पुरवठा करणारया ९०० मी मी व्यासाची वितरण वाहिनी वरील २00 मी मी व्हाँल्व सर्विस रोड जवळ मेट्रो च्या कामामुळे फुटल्यानं हा पाणी पुरवठा विस्कळित झाला होता. हा बिघाड तातडीने दुरूस्ती करण्याचे काम पाणी पुरवठा विभागामार्फत हाती घेण्यात आले आहे. या कारणामुळे सिद्धेश्वर, समतानगर, जॉनसन, ईटरनिटी, दोस्ती, आक्रुती जलकुंभास होणारा पाणी पुरवठा काल बंद होता. त्यामुळे काल रात्री पाणी पुरवठा न झाल्यानं अनेकांची तारांबळ उडाली. तरी नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे.