ठाणे रोटरीतर्फे शहीदांच्या कुटुंबियांसाठी १ कोटींचा निधी जमा केला जाणार

ठाणे रोटरीतर्फे शहीदांच्या कुटुंबियांसाठी १ कोटींचा निधी जमा केला जाणार आहे. या निधी संकलनासाठी भारत के वीर की सवारी या मोटरसायकल रॅलीचा शुभारंभ काल उपवन येथून करण्यात आला. कर्नल विनिश नायर यांच्या हस्ते झेंडा दाखवून हा शुभारंभ करण्यात आला. भारत के वीर की सवारीमध्ये एकूण १४ मोटरसायकल रॅली ग्रुप असून यामध्ये दोन महिला आणि १२ पुरूष आहेत. शहीदांच्या कुटुंबियांसाठी १ कोटींचा निधी गोळा करणे आणि मेक इंडियाच्या माध्यमातून सकारात्मक निरोगी आरोग्य जागरूकता अभियान आणि भारतातील रोटरीची १०० वर्ष या निमित्तानं होणारा उत्सव या तीन माध्यमांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी हे मोटरसायकल पटू निघाले आहेत. गोल्डन चतुर्भुज राष्ट्रीय महामार्गानं दिल्ली, कलकत्ता, चेन्नई, बंगलोर ते ठाणे या मार्गाने ६ हजार १२० किलोमीटरचा प्रवास ते १७ दिवसात करणार आहेत. यावेळी भारतातील १३ राज्य, ८० शहरांमधील रोटरी क्लब आणि सशस्त्र दल स्थानकांना भेट देणार आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading