ठाणे रेल्वे स्थानकात स्वच्छता कायम रहावी याकरिता जनजागृती मोहिम

स्वच्छ भारत अभियानांतर्गत ठाणे रेल्वे स्थानकात स्वच्छता कायम रहावी याकरिता प्रवाशांना थुंकू नका आणि कोणाला कचरा करू देऊ नका अशी जनजागृती मोहिम राबवण्यात येत आहे. प्रवाशांना गुलाब पुष्प देऊन थुंकू नका आणि थुंकू देऊ नका अशी शपथही या मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी देण्यात आली. काही प्रवासी प्रवास करताना रेल्वे डब्यात तसंच स्थानिक परिसरात थुंकून घाण करतात. यामुळं प्रवाशांमध्ये जनजागृती व्हावी याकरिता स्वच्छ रेल्वे, सुंदर रेल्वे, सुंदर प्रवास असे घोषवाक्य रेल्वे प्रवाशांनी मनामध्ये घेऊन प्रवास केला तर रेल्वेचा प्रवास स्वच्छ होईल. रेल्वे हे प्रवासाचे महत्वाचे साधन समजून रेल्वेत थुंकू नये याकरिता ठाणे रेल्वे स्थानकात ही जनजागृती करण्यात आली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading