प्लास्टीक बंदीच्या पार्श्वभूमीवर प्लास्टीकला पर्याय म्हणून कागदी आणि कापडी पिशव्या बनवण्याच्या उद्योगाला महिलांनी प्राधान्य द्यावं याकरिता ठाणे महापालिकेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या मार्गदर्शन शिबीराला बचत गटातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या शिबीरात सर्व महिलांना प्लास्टीक न वापरण्याची शपथ देण्यात आली. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्तानं केंद्र सरकारतर्फे राबवल्या जात असलेल्या स्वच्छता ही सेवा या उपक्रमांतर्गत शहरभर स्वच्छतेचे विविध उपक्रम राबवले जात आहेत. प्लास्टीकला पर्याय म्हणून कागदी आणि कापडी पिशव्या बनवण्याच्या उद्योगाला महिलांनी प्राधान्य द्यावे तसंच कागदी आणि कापडी पिशव्यांचा वापर जास्त करावा, याबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आलं.