ठाणे पोलिसांनी मुंब्रामध्ये एकही धर्मांतर झालं नाही अशी घोषणा केल्यामुळे उत्तर प्रदेश पोलीस उघडे पडले आहेत. उत्तर प्रदेश पोलीसांनी मुंब्र्यात ४०० जणांचं धर्मांतर झाल्याचा आरोप केला होता. पण ठाणे पोलीसांमुळे ते आता अडचणीत आले आहेत. हा एका समाजाला बदनाम करण्याचा मोठा कट असल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. राज्य सरकारने गंभीरपणे यावर विचार केला पाहिजे तसंच ठाणे पोलीसांनी नाराजीचे पत्र पाठवले पाहिजे अशी अपेक्षाही आव्हाड यांनी व्यक्त केली आहे. हा एक दंगल घडवण्याचा प्रकार होता. शहराला बदनाम केलं जात असून आपण आमदार झाल्यापासून एकदाही तणाव झालेला नाही. आपण या संदर्भात गृहमंत्र्यांना पत्र लिहिणार असून त्यांनी गझियाबाद पोलिसांना समज दिली पाहिजे असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.