जुलै महिन्यापासून ठाण्यामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे. पावसानं आता काहीशी उसंत घेतल्याचं दिसत आहे. ठाणे आणि आजूबाजूच्या परिसराला पाणी पुरवठा करणा-या धरणांच्या पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे. भातसा धरणामध्ये सध्या जवळपास ९० टक्के तर बारवी धरणामध्ये ७५ टक्के पाण्याचा साठा झाला आहे. भातसा धरणाची पाणी साठवण्याची क्षमता ९४२ दशलक्ष घनमीटर आहे तर सध्या धरणामध्ये ८४६ दशलक्ष घनमीटर पाण्याचा साठा आहे. बारवी धरणाची क्षमता ३३८ दशलक्ष घनमीटर असून सध्या धरणामध्ये २५२ दशलक्ष घनमीटर पाण्याचा साठा आहे. जुलै महिन्याच्या मध्यावरच धरणांमध्ये चांगला पाणी साठा असल्यामुळे सध्या तरी पाणी टंचाईची भीती संपली आहे.