ठाणेकरांच एक आकर्षण असलेला तलाव पाळी परिसर फेरीवाला मुक्त करण्याचे आदेश

ठाणेकरांच एक आकर्षण असलेला तलाव पाळी परिसर फेरीवाला मुक्त करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहे. तलाव पाळी परिसरात मॉर्निंग वाक पासून संध्याकाळपर्यंत ठाणेकरांची रेलचेल असते. या परिसरात नागरिकांना फिरता यावं याकरिता हा परिसर फेरीवाला मुक्त करण्यात आल्याने नागरिकांनाही मुक्तपणे वावरणं शक्य होत. वर्षानुवर्ष या ठिकाणी असलेल्या नोंदणीकृत फेरीवाल्यांचे पुनर्वसन करून फेरीवाल्यांसाठी पर्यायी जागा निश्चित करावी आणि त्याचा खाऊ गल्ली म्हणून विकास करावा असे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहे. महापालिका आयुक्तांनी मासूदा तलावाची पाहणी केली. त्यानंतर महापालिका आयुक्तांनी हे आदेश दिले, या पाहणी दरम्यान तलाव सभोवती असलेले कट्टे किमान दोन वेळा स्वच्छ धुऊन परिसर स्वच्छ ठेवावा, तलावाभोवती असलेल्या विद्युत कामांची देखभाल करून ते सुस्थितीत ठेवावेत. तलावाच्या आतील बाजूस एलईडी दिवे लावावे ज्यामुळे या परिसराचा परिसराच्या भर पडेल. तसेच पाणपोई लगतची जागा स्वच्छ राहील, पाण्याची टाकी स्वच्छ ठेवावी अशा सूचना महापालिका आयुक्तांनी दिल्या. तलाव परिसरातील खबांवर लावलेली भित्तिपत्रक काढून भित्तीपत्रका लागणार नाहीत याची दक्षता घ्यावी तसेच त्यांच्यावर दंडत्मक कारवाई करावी असे आदेशही महापालिका आयुक्तांनी दिले. ठाणे रेल्वे स्थानकात रोज सहा ते सात लाख प्रवासी प्रवास करत असतात त्यामुळे स्थानकाच्या दोन्ही बाजूला गर्दी होत असते नागरिकांचा वावर सुलभतेने व्हावा याकरता दोन्ही बाजूला स्थानकाच्या दीडशे मीटरच्या परिसरात एकही फेरीवाला राहणार नाही, याचा नियोजन करावे असे आदेशही पोलिसांनी दिले. ठाणे रेल्वे स्थानक परिसर तलाव पाळी परिसर या ठिकाणी कोणताही फेरीवाला राहणार नाही यासाठी रोज कारवाई करावी असे आदेश महापालिका आयुक्ताने दिले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading