जूनच्या अखेरच्या सप्ताहात पावसाची जोरदार हजेरी

जून महिन्यात दडी मारणा-या पावसानं जूनच्या अखेरच्या सप्ताहात जोरदार हजेरी लावली. शहरातच नव्हे तर धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही चांगला पाऊस होत असल्यामुळं धरणांच्या पाणीसाठ्यात काहीशी वाढ झाली आहे. ठाणे आणि आजूबाजूच्या परिसराला भातसा आणि बारवी धरणातून पाणी पुरवठा केला जातो. सकाळी साडेआठला संपलेल्या २४ तासात भातसा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ७४ तर बारवी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ९५ मिलीमीटर पाऊस झाला आहे. या पावसामुळं धरणांच्या पाणी साठ्यात साधारणत: १ ते २ टक्क्यानं वाढ झाल्याचं दिसत आहे. भातसा धरणामध्ये सध्या २२८ दशलक्ष घनमीटर म्हणजे २४ टक्के तर बारवी धरणामध्ये ३९.५४ दशलक्ष घनमीटर म्हणजे १७ टक्के पाणी साठा दिसत आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading