जिल्ह्यामध्ये २८ मे ते ९ जून दरम्यान अतिसार नियंत्रण पंधरवडा

जिल्ह्यामध्ये २८ मे ते ९ जून दरम्यान अतिसार नियंत्रण पंधरवडा राबवला जाणार आहे. या कालावधीत आरोग्य यंत्रणांमार्फत घरोघरी अतिसाराबाबत जनजागृती, कारणं आणि उपचाराबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. अतिसारामुळे होणारे बालमृत्यू शून्य करणं हे उद्दिष्ट समोर ठेवून हा पंधरवडा राबवला जाणार आहे. जिल्ह्यामध्ये अतिसार नियंत्रण आणि उपचारासाठी १५ लाख १८ हजार ७२० ओआरएसची पाकिटं आणि १ कोटी ५ लाख ५५ हजार ९२२ झिंक टॅबलेटस् वाटल्या जाणार आहेत. वैयक्तीक स्वच्छतेचं महत्व, ओआरएस द्रावण तयार करण्याचं प्रशिक्षण, हात धुण्याचं प्रशिक्षण अंगणवाडीतील मुलांना दिलं जाणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading