जल जीवन सर्वेक्षण 2023 चा भाग म्हणून ठाणे जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा स्तरावर राबविण्यात येणाऱ्या “स्वच्छ जल से सुरक्षा” अभियानाचा शुभारंभ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा पुष्पाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. हे अभियान 31 डिसेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. या अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील नळ पाणी पुरवठा योजनेच्या अस्तित्वातील सर्व स्त्रोतांचे जिओ टॅगिंग, पाणी गुणवत्ता परीक्षण तसेच एफटीकेद्वारे तपासणी आणि त्यासाठीचे प्रशिक्षण 31 डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच स्वच्छ भारत मिशन ग्रामीण 2023 हे अभियान 19 नोव्हेंबर 2022 ते 02 ऑक्टोबर 2023 यामध्ये लोकसंख्येनुसार स्पर्धेसाठी 3 गट तयार केले आहेत. हागणदारीमुक्त अधिक गावाला 100 गुण घोषित केले आहेत. जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर ग्रामपंचायतीचे श्रेणीकरण, एक स्टार ते पाच स्टार श्रेणीकरण तसंच ग्रामपंचायतींना पुरस्कार देण्यात येणार आहेत.