लोकसभा निवडणुकीकरिता दाखल झालेल्या अर्जांची आज छाननी झाली असून जिल्ह्यातील तिन्ही लोकसभा मतदारसंघात १८ हून अधिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ठाणे लोकसभा मतदारसंघात २५ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केली होती. त्यापैकी ५ उमेदवारांची नामनिर्देशन पत्र अवैध ठरली. त्यामुळं २० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघात ३६ उमेदवारांनी आपली नामनिर्देशन पत्रं दाखल केली होती. त्यातील ४ उमेदवारांची नामनिर्देशन पत्रं अवैध ठरली. त्यामुळं कल्याण लोकसभा मतदारसंघात ३२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भिवंडी लोकसभा मतदारसंघात २२ उमेदवारांनी आपली नामनिर्देशन पत्रं दाखल केली होती. त्यापैकी ४ उमेदवारांची नामनिर्देशन पत्रं अवैध ठरली. त्यामुळं आता या मतदारसंघात १८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. जिल्ह्यामधील तिन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये १८ हून अधिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात शिल्लक असले तरीही प्रत्येक ठिकाणी दुरंगी लढत होण्याची शक्यता आहे. ठाण्यामध्ये शिवसेनेचे राजन विचारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंद परांजपे, कल्याणमध्ये शिवसेनेचे श्रीकांत शिंदे आणि राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील तर भिवंडीमध्ये भारतीय जनता पक्षाचे कपिल पाटील आणि काँग्रेसचे सुरेश टावरे यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे.