राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्ताचं औचित्य साधून जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमध्ये प्लास्टीक बंदीचा ठराव करण्यात आला असून २ ऑक्टोबर रोजी गावातील प्लास्टीक कचरा संकलित करून तालुक्याच्या संकलन केंद्राच्या ठिकाणी जमा करण्याचं आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांनी केलं आहे. जिल्ह्यात स्वच्छता ही सेवा या उपक्रमांतर्गत विविध स्वच्छतेचे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. केंद्रीय शासनाच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. स्वच्छता ही सेवा हा उपक्रम ११ सप्टेंबर पासून सुरू झाला असून श्रमदान करून स्वच्छता करणं, ग्रामपंचायतींमध्ये ओल्या कच-याचे खतामध्ये रूपांतर करणं, एका खड्ड्याच्या शौचालयाचे २ खड्ड्यात रूपांतर करणं, हात धुण्याबाबत प्रशिक्षण घेणं, सांडपाण्यासाठी शोष खड्ड्यांची आणि सार्वजनिक पाझर खड्ड्यांची बांधकामं केली जाणार आहेत.