जिल्ह्यातील कोरोना बाधितांची घट हे जिल्ह्यासाठी दिलासादायक – जिल्हाधिकारी

कोरोनावर उपचार होऊन बरे होऊन घरी जाणा-यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे कालच्या जिल्ह्याच्या आकडेवारीचा विचार केला तर घरी गेलेल्यांची संख्या वाढत असून जिल्ह्याच्या कालच्या आकडेवारीत ५१६ ने बाधित रूग्णांच्या संख्येत घट झाल्याचं दिसत आहे. ही निश्चितच जिल्ह्यासाठी दिलासादायक आणि आशा निर्माण करणारी बातमी असल्याचं जिल्हाधिका-यांनी सांगितलं. राज्य शासन, स्टेट टास्क फोर्सचे मार्गदर्शन आणि जिल्हा टास्क फोर्सच्या कामकाजामधून हे उपचाराचं प्रमाण चांगलं होऊन बाधित रूग्णांचं प्रमाण कमी होईल आणि जास्तीत जास्त रूग्ण बरे होतील आणि आपण या कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करू शकू याची खात्री असल्याचं जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading