जिल्ह्याच्या शहरी भागात आणखी पाणी कपात नाही – जिल्हाधिकारी

जिल्ह्याच्या शहरी भागात सुरू असलेल्या पाणी कपातीमध्ये वाढ होणार नाही. जिल्ह्याच्या शहरी भागात गेल्या नोव्हेंबरपासून पाणी कपात लागू करण्यात आली आहे. मात्र आता यामध्ये वाढ होणार नसल्याचं जिल्हाधिका-यांनी सांगितलं. जिल्हाधिका-यांनी पाणी टंचाई संदर्भात एका आढावा बैठकीचं आयोजन केलं होतं. या आढावा बैठकीत जिल्ह्याच्या शहरी आणि ग्रामीण भागातील पाणी टंचाईचा आढावा त्यांनी घेतला. ज्या गावातून अथवा पाड्यातून टँकरची मागणी येईल ती गावं आणि पाड्यांना तात्काळ टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा असे आदेश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील शहरी भागात पाणी पुरवठा करणा-या धरणांमध्ये १५ जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळं नोव्हेंबरमध्ये लागू केलेल्या पाणी कपातीत वाढ करण्यात येणार नाही असं जिल्हाधिका-यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading