जिल्हृयामध्ये झालेल्या लोक न्यायालयात ४८ हजार ९६८ दाव्यांमध्ये १२८ कोटींची रक्कम तडजोड म्हणुन मंजुर

जिल्हृयामध्ये झालेल्या लोक न्यायालयात ४८ हजार ९६८ दाव्यांमध्ये १२८ कोटींची रक्कम तडजोड म्हणुन मंजुर करण्यात आली जिल्हा विधी सेवा प्राधीकरणाचे सचीव इश्वर सुर्यवंशी यांनी ही माहिती दिली. जिल्हा न्यायालयातिल प्रकरणांमध्ये ४७ कोटी मोटार वाहण अपघात प्राधीकरणात ३५ कोटी रुपयांची रक्कम मंजुर करण्यात आली. महसुली दाव्यांमध्ये १३ कोटी, वीज बीलांपोटी पावणे सात कोटी तर पाणी बीलां पोटी पाच कोटींची रक्कम तडजोड म्हणुन मंजुर करण्यात आली. कामगार न्यायालयातील लोक न्यायालयात सुमारे सव्वा तीन कोटींची रक्कम तडजोड म्हणुन मंजुर झाली. या लोक न्यायालयामध्ये २ लाख २९ हजाराहून अधिक प्रकरणं तडजोडी साठी ठेवण्यात आली होती त्यापैकी ४८ हजार ९८८ प्रकरणांमध्ये तडजोड होऊ शकली. जिल्ह्यातील लोक न्यायालयात ४८ कोटी रुपयांची तडजोड मंजुर करुन ठाणे तालुक्यानं प्रथम उल्हासनगरनं व्दितीय तर बेलापुरनं तृतीय क्रमांक पटकावला. या लोक न्यायालयासाठी ८८ पॅनेलची नियुक्ती करण्यात आली होती.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading