जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून श्रमजीवी संघटनेने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता, स्वातंत्र्याच्या 74 वर्षानंतर सुद्धा देशातील बहुसंख्य महिला संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांपासून वंचित आहेत, गरिबांना साधं घरकुल मिळालेलं नाही, रेशनवर पुरेस धान्य मिळत नाही, आदिवासी गाव पाड्यांमध्ये पुरेस पाणी नाही, वीज नाही, वैयक्तिक आणि सार्वजनिक शौचालय नाहीत या सर्व मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला स्नेहा पंडित, बाळाराम भोईर, आदी मान्यवर उपस्थित होते.