ठाण्यातील जय हिंद अभियान या सामाजिक संस्थेच्या वतीने शहीद दिनाच्या निमित्तानं बाईक रॅली काढण्यात आली होती. भगतसिंह राजगुरू आणि सुखदेव यांना २३ मार्च रोजी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. या दिवशी शहीद दिन म्हणून सर्वत्र या शहिदांच्या बलिदानाचे चिंतन केले जाते. तसेच त्याच्या आठवणींना उजाळा देत अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. ठाण्यातील जय हिंद अभियान या सामाजिक संस्थेच्या वतीने दरवर्षी बाईक रॅली काढली जाते. यंदाही या संस्थेचे अध्यक्ष गोपाल सिह.यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यातील पाचपखाडी येथून सुरू झालेली ही रॅली ठाण्यातील विविध भागातून जाताना या रॅलीत शेकडोच्या संख्येने ठाणेकर सहभागी झाले होते.