कोविडमुळे सर्वधर्मिय उत्सव साध्या पध्दतीने साजरे करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला असून यावर्षीचा छटपूजेचा उत्सवही अत्यंत साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तरी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यादृष्टीने नागरीकांनी तलाव, समुद्राकाठी एकत्रित न येता गर्दी टाळावी आणि घरीच थांबून साध्या पध्दतीने छठपूजा साजरी करावी. छठपूजा उत्सवाच्या ठिकाणी कोणत्याही स्वरुपाचे मंडप उभारण्यात येऊ नयेत.तसेच कोणत्याही प्रकारचे धार्मिक, सांसकृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नयेत.फटक्यांची आतिषबाजी, ध्वनीक्षेपणास बंदी असेल.महानगरपालिकांनी छटपुजेसाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्यात आली असून उत्सव कालावधीत नागरिकांनी विशेष करुन ज्येष्ठ नागरिक तसेच लहान बालके यांनी घराबाहेर पडू नये, नागरिकांनी गर्दी करू नये तसेच मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे.