ठाण्यामध्ये गेले काही दिवस पावसानं चांगलीच हजेरी लावली असून गेल्या २४ तासात जवळपास १०० मिलीमीटर पाऊस झाला आहे. सततच्या पावसामुळे हवेत सुखद असा गारवा अनुभवायला मिळत आहे. पावसामुळे पाणी टंचाईची भीती जवळपास गायब झाली आहे. राज्यभरातही पावसानं हजेरी लावली आहे. जुलैच्या सुरूवातीपासून पावसाने चांगली हजेरी लावली असली तरी गेल्यावर्षीच्या तुलनेत अद्यापही पाऊस कमी आहे. ठाण्यामध्ये आत्तापर्यंत ९८८ मिलीमीटर पाऊस झाला आहे. गेल्यावर्षी तो याच काळात १२७२ मिलीमीटर इतका होता. म्हणजे म्हणजे जवळपास २८४ मिलीमीटर पाऊस कमी झाला आहे.