गुढीपाडव्यानिमित्ताने राज्य सरकारच्या वतीने ‘आनंदाचा शिधा’ वाटप करण्यात आला. भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते कोपरीत या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. राज्यातील भाजपा-शिवसेना युती सरकारने सर्वसामान्यांचे सण आनंदात जावेत, यासाठी ‘आनंदाचा शिधा हा उपक्रम सुरू केला आहे त्या अंतर्गत ठाणे शहरातील नागरिकांना आनंदाचा शिधावाटप करण्यास कोपरी येथे सुरुवात करण्यात आली.या कार्यक्रमाला शिधावाटप विभागाच्या मुख्य अधिकारी सुरेखा चव्हाण यांच्या सह अनेकांची उपस्थिती होती.