गावदेवी येथील सफाई कामगारांना आमदार संजय केळकर यांच्या पाठपुराव्यामुळे हक्काची घरे

गावदेवी येथील सफाई कामगारांना आमदार संजय केळकर यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे 28 वर्षांनी हक्काची घरे मिळाली. गावदेवी येथे सफाई कामगारांची वसाहत होती. ती माळ्याच्या तीन इमारती होत्या. या इमारतीत सफाई कामगारांची 72 कुटुंब राहात होती. इमारती धोकादायक झाल्याने 1995 मध्ये महापलिकेकडून इमारती पाडण्यात आल्या आणि त्याबरोबर 18 महिन्यात पुन्हा याच ठिकाणी करणार आणि खोल्यांचे मालकी हक्क कामगारांना देणार असे सफाई कामगारांना करारनामे करून देण्यात आले होते. परंतु अनेक वर्ष कामगारांचे पुनर्वसन झाले नव्हते. यामुळे सफाई कामगार भगवान बारिया यांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी उपोषण ही केले होते. परंतु आश्वासना व्यतिरिक्त काही मिळालं नाही. याबाबत बारिया यांनी संजय केळकर यांची भेट घेतली होती. केळकर यांनी तात्काळ या विषयाबाबत महापालिकेकडे पाठपुरावा केला. अखेर 35 सफाई कामगार कुटुंबांच्या घरच्या लॉटरी काढण्यात आल्या. यावेळी सफाई कामगारांच्या डोळ्यात आनंद अश्रू होते. 28 वर्षात कोणी केले नाही ते केवळ एक वर्षाच्या आत केळकर यांनी आमच्यासाठी केले अशी भावना सफाई कामगारांनी बोलताना व्यक्त केली. यापूर्वीही केळकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आवास योजनाच्या माध्यमातून 56 सफाई कामगार कुटुंबांना आणि शेकडो बेघरांना कायमस्वरूपी घरे मिळवून दिली आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading