गणेशोत्सवादरम्यान लसीकरण बंद ठेवण्याच्या निर्णयाला धर्मराज्य पक्षाचा आक्षेप

ठाणे महापालिकेच्या गणेशोत्सवादरम्यान लसीकरण बंद ठेवण्याच्या निर्णयाला धर्मराज्य पक्षानं आक्षेप घेतला आहे.
केरळात ओनम साजरा झाल्यानंतर कोविडच्या प्रमाणात वाढ झाली होती. तिसर्‍या तीव्र लाटेची संभावना असताना गणेशोत्सवात महापालिकेनं लसीकरण बंद ठेऊन ठाणेकरांना आश्चर्यकारक धक्काच दिला. पहिल्या लाटेत वीस लाख, दुसऱ्या लाटेत चाळीस लाख तर तिसऱ्या लाटेत साठ लाख रूग्ण अपेक्षित असताना आणि १२ ते १८ वर्षाखालील मुलांना लसीकरणाची सुरूवात झाली नसताना तसंच लाखो नागरिकांचा दुसरा डोस झाला नाही, असं असताना गणेशोत्सवात लसीकरण बंद ठेवण्यात आलं आहे. प्रतिबंधात्मक लस हाच केवळ गुणात्मक उपचार असताना गणेशोत्सवात लसीकरण बंद ठेवणाऱ्या महापालिकेला तत्काळ लसीकरण चालू ठेवण्याचे आदेश द्यावेत आणि लसीकरण बंदच्या तुघलकी निर्णयाबाबत चौकशी करावी अशी मागणी धर्मराज्य पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांनी राज्याच्या आरोग्य मंत्र्यांकडे केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading