नामवंत महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी उडणारी झुंबड पाहून अनेक क्लासेस अशा पालकांची दिशाभूल करत असल्याचे समोर आले आहे दहावी बारावीचे निकाल लागल्यानंतर प्रवेशासाठी पालक वर्गाची धावपळ सुरू होते याचाच फायदा क्लासेस वाले घेत असल्याचे दिसत आहे. हे क्लासेस वाले अनेक नामवंत महाविद्यालयांशी आपला करार असून क्लासला तुम्ही प्रवेश घेतल्यास या महाविद्यालयातच तुम्हाला शिक्षण मिळणार आहे असं पालकांना सांगतात अशीच एक घटना समोर आली असून अशाच एका नामवंत महाविद्यालयाशी याबाबत संपर्क साधला असता प्रवेश फक्त महाविद्यालय अथवा विद्यापीठच देऊ शकतो असं सांगण्यात आलं. क्लासेसवाले यासाठी अवाच्या सवा शुल्क आकारत असून एकप्रकारे विद्यार्थी आणि पालक वर्गाची ही फसवणूकच असल्याचं दिसत आहे.