कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि गर्दीला आळा घालण्याकरिता कोकण विभागीय आयुक्तांनी सर्वसामान्य लोकांना रेल्वेतून प्रवास करण्यास मनाई केली आहे. कोकण विभागीय आयुक्त शिवाजीराव दौंड यांनी काल हे आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांनाच त्यांची ओळखपत्रं दाखवून रेल्वेतून प्रवेश दिला जाणार आहे. कोकण विभागीय आयुक्तांनी सर्व रेल्वे स्थानकांवरील प्रवेशद्वारांवर बॅरिकेटस् लावून प्रवाशांना रोखण्याचे आदेश दिले आहेत.