दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कोकण ग्राम विकास मंडळाच्या वतीनं मालवणी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. ३ ते १२ जानेवारी दरम्यान उन्नती गार्डन मैदानात हा मालवणी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. मालवणी दशावतारी नाटक, डबलबारी, महिलांसाठी होम मिनिस्टर अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यस्तरीय काव्यस्पर्धा आयोजित करण्यात आली असून बाबा या विषयावर कविता सादर करायच्या आहेत. विजेत्या कवींना यमुनाबाई राणे पुरस्कार दिला जाणार आहे. तसंच मैदानात रोज अग्निहोत्र केलं जाणार आहे. या महोत्सवास माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. ठाणेकरांसाठी कोंबडी वडे, सागोती आणि चवदार मच्छी ही या मालवणी महोत्सवाची खासियत असणार आहे. या महोत्सवाला एकदा तरी भेट द्यावी असं आवाहन मालवणी महोत्सवाचे आयोजक सिताराम राणे यांनी केलं आहे.