सेवानिवृत्तीनंतरचं आयुष्य हे स्वत:साठी आणि कुटुंबासाठी व्यतित करा – महापौर

सेवानिवृत्तीनंतर आयुष्याची नवीन सुरूवात आहे. नोकरीत असताना आपल्या कुटुंबियांना वेळ देता येत नाही. नोकरीतील संपूर्ण आयुष्य हे अधिकारी-कर्मचारी महापालिका सेवेत व्यतित करत असताना शहराच्या विकासातही त्यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळं सेवानिवृत्तीनंतरचं आयुष्य हे स्वत:साठी आणि कुटुंबासाठी व्यतित करा असा सल्ला महापौर नरेश म्हस्के यांनी दिला. महापालिकेच्या सेवेतून नियत वयोमानानुसार निवृत्त होत असलेल्या कर्मचा-यांसाठी निरोप समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी महापौर बोलत होते. सेवानिवृत्तीनंतरचा दिवस हा नवीन आशा आणि स्वप्नांची किरणं घेऊन येणारा दिवस आहे. त्यामुळं आयुष्याची नवीन सुरूवात ही प्रत्येकानं आपल्या पध्दतीनं करावी असं महापौरांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading