केंद्रीय जलजीवन समितीनं जिल्ह्याचा दौरा करत प्रादेशिक पाणी पुरवठा योजना आणि स्वतंत्र नळ पाणी पुरवठा योजनेची गावपातळीवर जाऊन पाहणी केली. या समितीनं जिल्ह्यात सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनांचा आढावा घेत समाधान व्यक्त केलं. जलजीवन मिशनचं उद्दिष्ट हे प्रत्येक कुटुंबाला नळ जोडणी देणे आणि प्रत्येकाला ४० ऐवजी ५५ लिटर पाणी उपलब्ध करणे असून या समितीनं जिल्ह्यातील पर्जन्यमान, विविध पाणी पुरवठा योजना, सर्व कुटुंबांना नळ जोडणी देणे, योजनांची देखभाल-दुरूस्ती आदी विषयांवर मुख्य कार्यकारी अधिका-यांशी चर्चा केली. त्यानंतर पाणी पुरवठा योजनांची पाहणी करण्यासाठी भिवंडी तालुक्यातील वालशिद, सोनाळे, कळंबे या गावात जाऊन प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनांची पाहणी केली.