कल्याण मध्ये मित्रानेच केली मित्राची हत्या

कोळशेवाडी परिसरात किरकोळ वादातून मित्रांनेच मित्राची हत्या केली असून पोलिसांनी अवघ्या काही तासात आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. कल्याण कोळशेवाडी खडेगोलवली परिसरात अनिलकुमार यादव आणि हिरालाल निशाद हे दोघे मित्र भाड्याच्या रूममध्ये राहत असून एका चपलीच्या कारखान्यात काम करत होते. काल हे दोघे मित्र एका ठिकाणी पार्टी करण्यास बसले होते. यादरम्यान या दोघांमध्ये किरकोळ वाद झाला आणि हिरालालने आज तुझे रात को बताता हॅूं अशी धमकी दिली. त्या दिवशी त्याने रात्रभर जागा राहत अनिलकुमार झोपल्यानंतर त्याची गळा आवळून ह-त्या केली. पहाटे जेव्हा अनिल कुमार चे इतर मित्र त्याला उठवण्यात आले तर तो जागेवरून उठला नाही. हे पाहताच त्याच्या मित्रांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. कोळशेवाडी पोलिसांनी त्वरित घटनास्थळी दाखल होत पाहणी केली असता अनिल कुमार याची गळा आवळून हत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली. यानुसार पोलिसांनी चौकशी करत हिरालाल याला ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याने अनिल कुमारची ह-त्या केल्याचं पोलिसांना सांगितले. सध्या पोलीस त्याप्रकरणी पुढील तपास करत आहे.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading