कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात धुळीमुळे होणाऱ्या प्रदूषणात कमालीची वाढ झाली असून रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर धूळ साचल्याने शहराला बकाल स्वरूप आले आहे. तर या धुळीमुळे होणाऱ्या आजारांच्या रुग्णामध्ये वाढ झाल्याने पालिका प्रशासनाकडून डस्ट मिटीगेशन मशीन केंद्र सरकारच्या १५ व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून मिळालेल्या निधीतून दोन धूळशमन वाहन खरेदी करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे ही मशनरी सीएनजीवर चालणार असल्याने यातून कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही. बहुतांशी पालिका प्रशासनाकडून मिटीगेशन मशीन वापरल्या जात असल्या तरी त्या डिझेलवर चालतात.तर केडीएमसीने सीएनजीवर चालणारी मशीन खरेदी केली असून भारतातील ही पहिली मशीन असल्याचा पालिका प्रशासनाचा दावा आहे. दुसरीकडे या मशनरीसह कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने १३ लार्ज रिफ्युज कॉम्पेक्टर १० मोबाईल टॉयलेट गाड्या ज्या सीएनजी वरती चालतात यादेखील पालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आले असून सर्व गाड्यांचे लोकार्पण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त भाऊसाहेब दांडगे यांच्या हस्ते करण्यात आले.