कल्याण- डोंबिवलीतील खड्ड्यांमुळे वाहन चालकांसह वाहतूक पोलीसही त्रस्त

कल्याण- डोंबिवलीतील खड्ड्यांमुळे वाहन चालकांसह वाहतूक पोलीसही त्रस्त झाले आहेत. कल्याण पश्चिमेकडील शिवाजी चौक या सर्वाधिक वर्दळीच्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला असलेले पेव्हर ब्लॉक उखडून पडलेले खड्डे वाहन चालकांना दिसत नसल्याने या खड्ड्यात दुचाकी कलंडून अपघात होत आहेत. कल्याण वाहतूक पोलिसांनी रस्त्यावर खडी टाकून हे पेव्हर ब्लॉक मधील खड्डे बुजवले. अंगावरील वर्दी मातीने लाल झाली असली तरी वाहन चालकांचा जीव वाचवण्याचे समाधान वाहतूक पोलिसांच्या चेहऱ्यावर दिसत होते.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading