उल्हास आणि वालधुनी नदीच्या स्वच्छतेसाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्याची खासदार श्रीकांत शिंदे यांची मागणी

उल्हास आणि वालधुनी नदीच्या स्वच्छतेसाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्याची मागणी कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली आहे. वालधुनी नदी मोठ्या प्रमाणावर प्रदूषित झाली असून यामुळं नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या परिसरातून वाहणारी उल्हास नदीही प्रदूषणानं वेढली गेली आहे. या दोन्ही नद्यांच्या पाण्याचा वापर पिण्यासाठी तसंच पिकांसाठीही केला जातो. या दोन्ही नद्या प्रदूषण मुक्त करण्यासाठी मुंबईतील मिठी नदीच्या धर्तीवर वालधुनी नदी प्राधिकरण स्थापन करण्यात यावं अशी मागणी खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली. त्यावेळी आपण प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करू अशी ग्वाही पर्यावरण मंत्र्यांनी यावेळी दिली. डोंबिवली औद्योगिक परिसरातील निवासी विभागात होणारं प्रदूषण थांबवावं अशी मागणीही खासदार श्रीकांत शिंदे यांनी यावेळी केली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading