इंडीयन सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशन म्हणजे आयसीएसई बोर्डाचा निकाल जाहीर झाला असून या निकालात बारावीच्या परीक्षेत ठाण्यातील २ विद्यार्थी चमकले आहेत. आयसीएसई बोर्डाचा दहावी-बारावीचा निकाल काल जाहीर झाला. राज्यातून ४४ शाळातील २ हजार ७३७ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षीचा निकाल चांगला लागला असून या परीक्षेत राज्यातील उत्तीर्ण होणा-यांची टक्केवारी ही ९९.८५ टक्के आहे. ठाण्यातील सुलोचनादेवी सिंघानिया स्कूलचे श्रेया राज आणि निमिष वाडेकर हे दोन विद्यार्थी अखिल भारतीय स्तरावर तिसरे आले असून त्यांना ९९.५० टक्के गुण मिळाले आहेत.