आमदार जितेंद्र आव्हाडांचं संभाजी भिडे यांच्या विरोधात तक्रार नोंदवून घेण्यासाठी आंदोलन

संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्याबाबत संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन पेटून उठताना दिसत आहे.

अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील नौपाडा पोलिस स्थानकात संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवत गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली होती. आमदार जितेंद्र आव्हाड त्यांच्या कार्यकर्त्यांसह पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवून घेत नाही तोपर्यंत ठिय्या मांडून बसल्याचे दिसून आले. तब्बल एक तासांहून अधिक काळ ठिय्या मांडून काही काळ पोलिसांसोबत चर्चा करून अखेरीस संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्याबाबत ठाण्यात एफआयआर दाखल करुन घेतली आहे.
महाराष्ट्रात उठाव झाला पाहिजे. महाराष्ट्र हा शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांचाच आहे. मणिपूरवरील लक्ष विचलित करण्यासाठीच भिडेला पुढे केले. आता भिडेला जर अटक केली नाही तर ठाण्यात आंदोलन पेटणार, असे वक्तव्य यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading