ठाण्यात सलग तिस-या दिवशी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. संध्याकाळी साडेसात ते साडेआठ या वेळात तब्बल ३ मिलीमीटर पाऊस झाला आहे. ठाण्यामध्ये गेले दोन दिवस असाच जोरदार पाऊस पडत असून आज तिस-या दिवशीही पाऊस पडत आहे. आज अनंत चतुर्दशी असल्याने गणेशभक्त विसर्जनासाठी निघाले आहेत. संध्याकाळच्या सुमारास पावसानं काहीशी विश्रांती घेतली होती. मात्र नंतर रात्री पुन्हा जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं असून लोकांच्या घरातही पाणी गेलं आहे. मात्र या भर पावसातही गणेश विसर्जनाचा जल्लोष सुरूच आहे. भर पावसात ढोल ताशा बँडच्या निनादात गणेश विसर्जनासाठी भक्तांचा उत्साह वाहून जात असल्याचं दिसत आहे.