सर्वोच्च न्यायालयानं सांगितलेल्या कालावधीनंतर अवेळी फटाके उडवणा-या चौघांविरूध्द ठाणे पोलीसांनी गुन्हे दाखल केले आहेत.तुषार सोनार, सोमनाथ कांबळे, रवि गोटवानी यांच्यावर गुन्हे दाखल झाले असून महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३१ नुसार आणखी २२ जणांविरूध्द अशीच कारवाई करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयानं रात्री ८ ते १० या वेळेतच फटाके उडवण्याचे निर्बंध घातले होते. मात्र तरीही इतर वेळी फटाके फोडण्यात आल्यानं पोलीसांनी ही कारवाई केली आहे. डोंबिवलीमध्ये १४, उल्हासनगरमध्ये ३, वर्तकनगर पोलीस ठाण्यात ५ जणांवर अशाप्रकारे कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.