अवकाळी पावसामुळे डाळींच्या किंमतीत वाढ – ग्राहकांसह व्यापा-यांनाही फटका

नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात डाळींचे भाव वधारले असून गेल्यावर्षीच्या तुलनेने 20 ते 25 टक्क्यांनी डाळीच्या किंमती वाढल्या आहेत त्यामुळे महिलांचं बजेट पूर्णपणे कोलमडलं आहे. त्यात अवकाळी पाऊस आणि दमट हवामानामुळे डाळीची आवक घटली आहे. तूरडाळ खूप कमी प्रमाणात बाजारात येत आहे. तसेच वातावरणाचा सुध्दा परिणाम झाला असून आधीच पेट्रोल, डिझेल महाग असल्याचे परिणाम नागरिकांना सहन करावे लागत आहेत. त्यात आता जेवणाच्या ताटावर दरवाढीचा परिमाण झाल्याने घरचे जेवण महाग झाले आहे. त्यामुळे आधीच मेटाकुटीला आलेल्या सामान्य माणसाच्या हाती महिन्याच्या अखेरीस आलेल्या पगारातून काहीच शिल्लक राहत नाही. ग्राहक नाराज आहेत, काहीजण घेत नाहीत, तर काहीजण कमी माल घेत आहेत, त्यामुळे आम्हालाही याचा फटका बसत आहेत असे व्यापारी सांगत आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading