जिल्ह्यातील कुपोषित बालकांची संख्या कमी करण्यासाठी महिला आणि बाल विकास विभाग तसंच आयआयटी मुंबईच्या संयुक्त विद्यमाने अन्न साखळी व्यवस्थापन कार्यशाळा डॉ. रुपल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. गरोदर मातांना दिला जाणारा आहार, गृहभेट, पौष्टिक आहार कोणते असावे अशा अनेक विषयांवर चर्चा करुन कुपोषित बालकांची संख्या कमी करण्यासाठी पुढाकार घेण्यासाठी तांत्रिक बाबी लक्षात घेऊन आयआयटी मुंबईच्या संयुक्त विद्यमाने कुपोषित बालकांची तपासणी करुन पौष्टिक आहार देण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांच्या आदेशानुसार कार्यशाळा आयोजित करण्यात आले होते. जिल्ह्यातील कुपोषित बालकांची संख्या जवळपास १८५२ आहे. अंगणवाडी सेविका आणि परिवेक्षिका काम करत आहेतच पण कुपोषित बालकांची संख्या कमी करण्यासाठी पुढाकार घेऊन कामास सुरुवात करण्याची गरज आहे. बाळ जन्माला आल्यापासून त्याला दिलेला आहार असेल आणि ब्रेस्ट फिंडीग करण्यासाठी मार्गदर्शन असेल असे प्रशिक्षण घेऊन आपल्याला सामान्य नागरिकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी आपल्याला काम करायचे आहे असे प्रतिपादन प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रुपाली सातपुते यांनी केले. या कार्यशाळेत सॅम मॅम बालकांची काळजी घेण्यासाठी उत्तम आहार व आरोग्य काळजी या संदर्भातील माहिती देण्यात आली.