महात्मा गांधी जयंती चे औचित्य साधत “अनुबंध” संस्थेच्या माध्यमातून समाजातील अंतिम घटक म्हणून सार्वजनिक स्वच्छ्ता गृह साफ करणारे आणि गटारामध्ये उतरून काम करणाऱ्या सफाई कामगारांचा यथोचित सन्मान करण्यात आला. महात्मा गांधींनी सांगितलेली श्रम प्रतिष्ठेची उंची गाठणाऱ्या कामगारांना समाजात केंद्रस्थान असावे अशी संस्थेची धारणा आहे. स्वातंत्र्यानंतर ही कामगार वर्गाचे शोषण आणि उपेक्षा होत आहे. समाजाच्या वाटचालीसाठी समाजातील सफाई कामगारांचे योगदान अतिशय मोलाचे आहे असे जगदीश खैरालिया यांनी सांगितले. तसेच सफाई कामगारांच्या मुलांनी शिक्षण घेऊन इतर कामाकडे वळले पाहिजे,उद्योग धंदे केलं पाहिजे असे आवर्जून सांगितले. व्यापारीकरणाच्या, वर्गभेदाच्या, जातीभेदाच्या पास्वभूमीवर यांच्या योगदानाची उचित नोंद घेतली जात नाही असा घटक म्हणजे सफाई कामगार आहे असे मीनल सोहोनी यांनी मांडले. सफाई कामगारांचे कष्ट, जातवास्तव, कामाची जागा, परिस्थिती, उपलब्ध साधने आणि समाजाची तुच्छता या वास्तवाला बदलण्याची गरज आहे त्या परिवर्तनाच्या लढाईत अनुबंध संस्था त्यांच्या सोबत आहे असे विशाल जाधव यांनी सांगितले. संस्थेच्या वतीने ४० सफाई कामगारांचा सन्मान करण्यात आला.