यंदाची शालांत परीक्षा रद्द करण्यात आली असली तरी आता अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे विद्यार्थ्यांना गुण देण्यात येणार असून त्याचा निकाल जून अखेरपर्यंत जाहीर होणार आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज ही घोषणा केली आहे. कोरोनामुळे २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाची शालांत परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु आता अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले जाणार आहे. त्याद्वारे गुणांकन करून दहावीचा निकाल जून अखेरपर्यंत लावला जाणार आहे. दहावीच्या मुलांसाठी लेखी मूल्यमापनाला ३० गुण, गृहपाठ, तोंडी परीक्षा आणि प्रात्यक्षिक २० गुण तर नववीच्या अंतर्गत मूल्यमापनावर ५० गुण अवलंबून असतील. ज्या विद्यार्थ्यांना अशा पध्दतीनं दिलेले गुण मान्य नसतील त्यांची परीक्षा कोविड नंतर घेण्यात येणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड आज दिली आहे.