लोकसभेची निवडणूक जाहीर झाली असून ठाणे जिल्ह्यामध्ये पाचव्या टप्प्यात म्हणजे २० मे रोजी मतदान होणार आहे. यंदा मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचं जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी सांगितलं.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत “महानाट्य” प्रेक्षकांसाठी विनामूल्य
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली आणि अलौकिक वारशाची महती, त्यांचे कार्य, नीती, चरित्र, विचार आणि कार्यकुशलतेची जनसामान्यांना, विशेष करून विद्यार्थ्यांना, तरुण पिढीला मार्गदर्शक ठरावी या उद्देशाने विविध उपक्रमांचे आयोजन शासन, सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
ठाणे गुन्हे शाखेनं अडीच कोटींच्या अंमली पदार्थासह २७ कोटींचा मुद्देमाल केला हस्तगत
ठाणे गुन्हे शाखा घटक १ च्या पथकाने उत्तरप्रदेशातील एमडी ड्रग्जची फॅक्टरी उध्वस्त केली आहे.
ठाणे शहरात बुधवारी झोनिंग पध्दतीने पाणीपुरवठा
ठाणे शहरात बुधवारी झोनिंग पध्दतीने पाणीपुरवठा होणार आहे.
भारत जोडो यात्रेदरम्यान ठाण्यात कॉंग्रेस छोडो अभियान – शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसला बाय बाय
भारत जोडो यात्रेदरम्यान ठाण्यात कॉंग्रेस छोडो अभियान सुरू असून राहुल गांधींना बाय बाय करून आमदार संजय केळकर यांच्या उपस्थितीत शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून कपिल पाटील यांना सलग तिसऱ्यांदा उमेदवारी
भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपाने सलग तिसऱ्यांदा कपिल पाटील यांना उमेदवारी दिली आहे.
सिंगल युज प्लास्टिक ची कडक अंमलबजावणी करण्याचे प्रदुषण नियंत्रण मंडळाचे निर्देश
सिंगल युज प्लास्टिकचे उत्पादन, वापर, वितरण, विक्री आणि साठवणूक यावर प्लास्टिक बंदी अधिनियमाद्वारे बंदी असताना देखील सिंगल युज प्लास्टिकचे वाढता वापर ही चिंतेची बाब असून या बंदीची कडक अंमलबजावणी केली जावी असे तातडीचे निर्देश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी दिले आहेत.
घोडबंदर रोडवरील वाहतुक कोंडींचा प्रश्न सुटणार – आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नाला यश
घोडबंदर रोडवरील वाहतुक कोंडींचा प्रश्न सुटणार असून आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नाला यश आलं आहे.
पोलीस अधिकारी-कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी नवीन मतदार नोंदणी शिबीर
आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने जिल्ह्यातील पोलीस दल, राज्य राखीव पोलीस दल, प्रशिक्षणार्थी पोलीस, कार्यरत आणि सेवा निवृत्त जवान, अग्निशमन सेवा, पोस्ट कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांचे नाव मतदार यादीमध्ये नोंदविण्याकरिता “माझी वर्दी, माझा मताधिकार” या अभियानांतर्गत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
ठाण्यातील सुंदर आणि स्वच्छ गृहसंकुलांच्या स्पर्धेत श्रवण एबी सोसायटीला प्रथम क्रमांक
ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन आणि एमसीएचआयच्या बेस्ट सोसायटी स्पर्धेमध्ये ठाण्यातील श्रवण एबी सोसायटीने प्रथम क्रमांक पटकावला आहे.