भातसा धरणाचं पाणी मुंबई महापालिकेच्या मागणीनुसार सोडलं जाणार आहे. सध्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचं प्रमाण कमी आहे. त्यातच जलविद्युत केंद्रही बंद आहे. त्यामुळे वक्रद्वाराद्वारे हे धरणातलं पाणी सोडलं जाणार आहे. साधारणत: उद्या सकाळी ६-६.३० पासून हे पाणी सोडलं जाणार आहे. यामुळं भातसा नदीतील पाण्याची पातळी वाढण्याची भिती आहे. त्यामुळे नदीच्या आजूबाजूच्या परिसरातील गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.