मंदिरं उघडावीत या मागणीकरिता भारतीय जनता पक्षातर्फे घंटाळी मंदिरासमोर आंदोलन करण्यात आलं. कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून मंदिरं बंद आहेत. राज्य शासनानं बार, रेस्टॉरंटला काही अटींवर परवानगी दिली आहे. मात्र मंदिरं वर्षाहून अधिक काळ बंद आहेत. त्यामुळं आता मंदिरं उघडावीत या मागणीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे घंटाळी मंदिरासमोर जोरदार आंदोलन करण्यात आलं. यावेळी घोषणा देऊन आणि शंख वाजवून शासन निर्णयाचा निषेध करण्यात आला.