मध्य रेल्वेची उपनगरीय सेवा विस्कळीत झाल्यानं आज चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाले. कल्याण ते विठ्ठलवाडी दरम्यान ८.११ च्या बदलापूर लोकलचा पेंटाग्राफ तुटल्यामुळं मध्य रेल्वेची सेवा ठप्प झाली होती. ऐन कामावर जाण्याच्या वेळेस हा प्रकार झाल्यानं चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाले. हा पेंटाग्राफ तुटल्यामुळं बदलापूरपासून छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे जाणा-या गाड्या ठप्प झाल्या होत्या. हा बिघाड दुरूस्त केल्यानंतर उपनगरीय सेवा पुन्हा पूर्ववत होऊ शकली. मात्र तोपर्यंत रेल्वे सेवा ठप्प होती. याचा फटका काही लांब पल्ल्याच्या गाड्यांनाही बसला होता. प्रवाशांना होणारा त्रास कमी करण्यासाठी कल्याण ते बदलापूर दरम्यान विशेष बसेसही सोडण्यात आल्या होत्या.