ठाण्यात काल शून्य सावली योग पहायला मिळणार होता. पण वादळसदृश्य स्थितीमुळे दिवसभर ढगाळ वातावरण असल्यामुळे शून्य सावलीचा अनुभव घेता आला नाही. वर्षातून दोन वेळा काही क्षणासाठी आपली सावली आपल्याबरोबर नसते. खगोलीय विश्वात या शून्य सावली योग असं म्हटलं जातं. मे महिन्यात आकाश निरभ्र असल्याने शून्य सावलीचा अनुभव घेता येतो. ठाण्यात काल १२ वाजून ३५ मिनिटांनी हा अनुभव घेता येणार होता पण दिवसभर असलेल्या ढगाळ वातावरणामुळे खगोलप्रेमींना या आनंदापासून मुकावं लागलं.