राबोडीत निघाली ७५ फूट झेंड्यासह तिरंगा रॅली

राबोडी या मुस्लिम बहुल विभागात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी नगरसेवक नजीब मुल्ला यांच्यावतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त “तिरंगा रॅली” काढण्यात आली. या रॅलीमध्ये सामाजिक एकात्मतेचा संदेश देणार्या घोषणा देण्यात आल्या.

Read more

‘घरोघरी तिरंगा’ आणि ‘स्वराज्य महोत्सव’ उपक्रमात नागरिकांनी उत्साहाने सहभागी होण्याचं जिल्हाधिका-यांचं आवाहन

जिल्ह्यात ९ ते १७ ऑगस्ट दरम्यान स्वराज्य महोत्सव अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. तसेच नागरिकांमध्ये देशाभिमान जागृत करण्यासाठी १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा हे अभियान राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी सोहळ्यात उत्स्फुर्तपणे तसंच उत्साहाने सहभागी होऊन हे उपक्रम साजरे करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुपाली सातपुते यांनी केले.

Read more

राष्ट्रध्वजाचा ‘मास्क’ विकणार्‍या ई-कॉमर्स संकेतस्थळे आणि दुकाने यांवर कायदेशीर कारवाई करण्याची सुराज्य अभियानाची मागणी

15 ऑगस्टच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा ‘मास्क’ विकणार्‍या ई-कॉमर्स संकेतस्थळे आणि दुकाने यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सुराज्य अभियानानं गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

Read more