धर्माधिकारी कुटुंबिय राज्यात गेल्या तीनशे चारशे वर्षांपासून लोकांना दिशा देण्याचे काम करत असून ज्ञानाच्या ज्योती घराघरात लावण्यासाठी या परिवाराचे मोठे योगदान आहे. उध्वस्त कुटुंबांना सावरण्याचं काम नानासाहेब, आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी केलं असून आता सचिनदादा धर्माधिकारी हा वारसा पुढे नेत आहोत. माणसं घडविण्याचं विद्यापीठ म्हणजे रेवदंडा असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी काढले.
nanasaheb dharmadhikari pratisthan
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे निर्माल्यापासून खत बनवण्याचा उपक्रम
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानातर्फे पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी आणि सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली रायलादेवी तलाव येथे गणेश मूर्ती विसर्जनाचे औचित्य साधून निर्माल्यापासून खत बनवण्याचा उपक्रम राबवण्यात आला.